Showing posts with label श्रीगुरुलीलामृत. Show all posts
Showing posts with label श्रीगुरुलीलामृत. Show all posts

May 14, 2021

ब्रह्मनिष्ठ वामन ( वामनबुवा ) रावजी वैद्यरचित श्रीगुरुलीलामृत


 श्रीगणेशाय नम  द्रां दत्तात्रेयाय नमः 

॥ श्री स्वामी समर्थ 

श्री दत्तप्रभूंचा अवतार असलेलें अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ यांच्या भक्तगणांत अलोट मान्यता लाभलेला ग्रंथ म्हणजे ब्रह्मनिष्ठ वामन ( वामनबुवा ) रावजी वैद्य रचित श्रीगुरुलीलामृत ! या ग्रंथाच्या नित्य पठणें । सर्व सिद्ध निःशंक होतें श्रवणें । गृहीं हा ग्रंथ संरक्षणें । दत्तदर्शन होईल ॥ अशी निश्चित प्रचिती देणारा हा अलौकिक ग्रंथ प्रामुख्याने श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरित्रावर आधारित आहे. ह्या दिव्य ग्रंथाच्या लेखनाच्या प्रेरणेविषयीं आत्मनिवेदन करतांना ब्रह्मनिष्ठ वामनबुवा म्हणतात - हें नाहीं नाहीं स्वकपोलकल्पित । वेदशास्त्रपुराणार्थरहस्यमथित । हृदयस्थ परमात्मा दत्तावधूत । त्यांचे तेचि वदविती ॥ अर्थात हा सिद्ध ग्रंथ स्वकपोलकल्पित नसून प्रत्यक्ष श्री दत्तप्रभूंनीच लिहून घेतला आहे. 

पंचावन्न अध्याय आणि ९७५८ ओव्या असलेल्या ह्या ग्रंथात धर्म, मीमांसा, व्याकरण, न्याय, ज्योतिष, वैद्यक आदि अनेक शास्त्रांचे सविस्तर विवेचन केले आहे. त्याखेरीज, श्रुति, स्मृति, पुराणे, वेद-उपनिषदें यांतील अनेक श्लोक-वचनेंही प्रतिपादित केली आहेत. श्रीगुरुलीलामृत या चरित्र ग्रंथात प्रत्येक अध्यायाच्या प्रारंभी वेदान्तातील काही प्रमेयांचे विश्लेषण आहे, तदनंतर त्याच अनुषंगाने श्रींच्या भक्तांच्या कथा आल्या आहेत. 

' भावेन विद्यते देव: ' या स्मृति वचनावर विश्वास ठेवून भाविकांनी या प्रासादिक ग्रंथाचे वाचन केल्यास श्री स्वामी समर्थांच्या कृपेची अनुभूती अवश्य येतेच. ही ग्वाही देतांना ग्रंथकार लिहितात - नित्यश: एक अध्याय तरी । सद्भावें वाचावा निर्धारीं । तयाचे सकल मनोरथ पूर्ण करी । श्रीसद्गुरुस्वामी निश्चयें ॥ 

ब्रह्मनिष्ठ वामन रावजी वैद्यरचित संपूर्ण श्रीगुरुलीलामृत अर्थात श्री अक्कलकोट स्वामी समर्थ चरित्र इथे वाचता येईल. 

  ॥ श्री स्वामी समर्थार्पणमस्तु 

  सौजन्य : http://swamisamarthmathindore.org/


Apr 20, 2021

श्रीगुरुलीलामृत अवतरणिका

 

 श्रीगणेशाय नम  द्रां दत्तात्रेयाय नमः 

॥ श्री स्वामी समर्थ ॥

॥ असो आतां प्रथमाध्यायापासून । संक्षेपें करू सिंहावलोकन । जें उपयोगी नित्यपाठालागून । मुमुक्षु जनांच्या येईल 

प्रथमाध्यायीं मंगलाचरण । गणेश सरस्वती कुलदेवी देवगण । महर्षि योगी संत सदगुरुवंदन । आणि वामनबुवांची वंशावलि ॥१॥ ग्रंथसिद्ध्यर्थ श्रीमत्सद्गुरू-वरदान । तैसेंचि साधन अनुबंध-चतुष्टय-निरूपण । वैराग्य शमादि षटक जाण । मुमुक्ष-लक्षण निरुपिले ॥२॥ व्दितीयाध्यायीं आदिनारायणापासून । केलीसे गुरुपीठिका निवेदन । आणि श्रीदत्तात्रेय-जन्मकथन । साकल्येंकरून वर्णिले ॥३॥ तृतीयाध्यायीं परमेश्वराचे बावीस अवतार । चतुर्युग-प्रमाण चतुर्दश मनु साचार । नवखंड पृथ्वी द्वीपें आणि सप्तसमुद्र । चतुर्दशलोक कथियेले ॥४॥ तैसेच चौऱ्यांशीलक्ष योनि-विवरण । आणि मानव-पशु-पक्ष्यादिकांचे आयु:प्रमाण । चतुर्युगोत्पत्ति शक निरूपण । विस्तारपूर्वक निवेदिलें ॥५॥ चतुर्थाध्यायीं हिमालयीं श्रीस्वामिराज दत्त । संचरतां चीन देशींचीं स्त्रीपुरुषें चेष्टायुक्त । निंदूनि यतिराया काम्यक्रीडोद्यूक्त । होतां चमत्कार दाविला ॥६ आणि कुरंगशिशु-सरंक्षण । करुनि चमत्कार दाविला व्याधालागून । मृग-मृगींस पूर्वजन्म-ज्ञान । होऊनि आशीर्वचन लाधलें ॥७ पांचव्यांत जयंत्या वर्णन । एकादशी-पौर्णिमा-निर्णय जाण । कपिलाषष्ठी आणि गजच्छाया महान । पर्वनिर्णय केलासे ॥८ त्यापरीच महेश्वरावतार द्वादशादित्वर्णन । अष्टवसु जगदंबावतार कथन । सप्तर्षि आणि सप्त तारे संपूर्ण । याच अध्यायीं कथियेले ॥९ सहाव्यांत अलवणीबुवांचे आख्यान । जन्मांध विप्रास दिव्यदृष्टि-दान । वृद्ध शुद्रास पूर्वजन्म-ज्ञान । होऊनि स्त्री-बालक भेटविली ॥१०॥ सातव्यांत तपस्व्यांस हिमालय-गुहेंत । ज्ञानामृत-कथन आणि द्वय व्याघ्रांप्रत । पूर्वजन्म-स्मृति होऊनि प्राप्त । उद्धार तयांचा केलासे ॥११॥ तैसेंच हिमालयाच्या पायथ्याशीं । वसे एक तपस्वी संन्याशी । त्यास दत्तस्वरूप-दर्शनासि । देऊनि हेतु सफल केले ॥१२॥ आठव्यांत हरिद्वारचें दोन मल्ल । द्विज जाति दुर्जन प्रबल । ग्रासिले महारोगें दुर्धर । मग शरण आले यतिवरा ॥१३ अनन्यभावें करितां स्तुति । पाद-स्पर्शे अर्पिली दिव्य कांति । तैसेंचि एका कुटिल द्विजाप्रति ।पूर्वजन्म कथन केले ॥१४॥ तयांचे गौहत्या पाप उघड केलें । पादोदकें मृत धेनूसि उठविलें । आणि स्वनाम कथूनि चतुर्वेद पठण केले । वेदांगांसहित यतींद्रे ॥१५॥ नवव्यांत कच्छदेशी त्रिविक्रम-मंदिर । आणि तीर्थ नारायण-सरोवर । तेथे घडलेले वृत्त समग्र । रसाळपणे कथियेलें ॥१६॥ दहाव्यांत द्वारका धामांत । भुऱ्याबुवा वसती संत । तयांसि श्रीमद्दत्तावधूत । देती सगुण दर्शन ॥१७॥ तयासंगे करिती सद्-बोध संभाषण । तत्त्वमसि महावाक्यार्थ विवरण । आणि साङ् लक्षणा निरूपण । शास्त्रयुक्त कथियेलें ॥१८॥ अकराव्यांत भुऱ्याबुवांचे सदनीं । अंध सुरदासास दिव्यचक्षु अर्पूनि । ब्रह्मज्ञानी होशील ऐशा आशीर्वचनी । तोषविती स्वामिराज ॥१९॥ आणि तेथेंच रावजी वैद्यलागून । काशीक्षेत्रीं भेटल्याची ओळख देऊन । त्रय पुत्रांचे भविष्य कथन । केलें यतिरायें साहजिक ॥२०त्यांत कनिष्ठ पुत्र वामन । याचे हस्तें गुरुलीलामृत ग्रंथ लेखन । होईल ऐसें आशीर्वचन । समर्पिले त्याच काली ॥२१॥ बाराव्यांत गिरनार-पर्वती । गौमुख तीर्थीं यतियूथपति । वसूनि पुढें हनुमानधारीप्रति । द्वयरजनी राहिले ॥२२॥ त्या हनुमानधारी स्थानांत । एक पांगळा गणेशपुरी संत । त्यास कृपावलोकनें त्वरित । चरण अव्यंग दिधले ॥२३॥ पुढें अंबाजीचे घेऊन दर्शन । गोरक्षनाथ अवघडनाथादि विलोकून । कमंडलुतीर्थीं पातले यतींद्र नारायण । शिष्यजनांसहित ॥२४॥ तेथे साधु रामदास सेवादास कृष्णदास । यांचे मनीं श्रीदत्तदर्शनाची आस । त्यांतें श्रीस्वामिरायें दत्तस्वरूप-दर्शनास । देऊनि कृतार्थता अर्पिली ॥२५॥ तेराव्यांत पंचज्ञानेंद्रिये पंचविषय । आणि सद्भावनिरूपण रसमय । चरणदास-मनींचा चित्तनिग्रह-संशय । दूर होय चंचलभारतीमुखें ॥२६॥ चौदाव्यांत जोगाईचें आंबे नामक । ग्रामींची कन्यका गोरक्षक । तियेसि पुरुषत्व अर्पिले चमत्कारिक । तें कथानक वर्णिलें ॥२७॥ पंधराव्यांत रामेश्वर क्षेत्रीच्या वृद्ध पुजाऱ्याचे कथानक  आणि अन्नसत्रावरील कारकुनाचें चमत्कारिक । वृत्त निवेदन कोटिकूप तीर्थींचे देख । तैसेंचि शिवकांचि-विष्णूकांचीचे ॥२८॥ सोळाव्यांत राजूरमठींचा वृत्तांत । आणि भीमेच्या महापुरावरुनि पंढरींत । पादचारी यतिराज गेले चालत । तो चमत्कार वर्णिला ॥२९॥ पुढें अक्कलकोटीं करिती वास । तेथें लालभारतीस ज्ञानोपदेश । आणि दाजीपिराजी भोंसल्यास । दर्शन देती मुंबईस ॥३०॥ नागनळी-दुधनीचा वृत्तांत । आणि गौडगांवी उठविला वृषभ मृत । लोहारगांवच्या बापू कुळकरण्याची होत । कंठछिद्रव्यथा निर्मूल ॥३१॥ सतराव्यांत मंगळवेढ्यांत । कृष्णंभट कापशीकराचे सदनांत । आटलेल्या धेनूप्रत । दुग्धदोहन करविलें ॥३२॥ शूद्रस्त्री जनाबाईचें वृत्त । बसाप्पा तेल्यास सर्पमय सुवर्ण प्राप्त । आणि गुप्त धन मिळे कोष्टयाप्रत । वृद्ध शूद्र स्त्रियेसि पुत्र लाधे ॥३३॥ बाबाजीभटाचे गृहीं कूप-चमत्कार । तैसाच चळआंब्यास श्रीयतिवर । रामदासी बुवाचे मठीं साचार । अपूर्व चमत्कार दाविती ॥३४॥ साधुत्व पावला एक अंत्यज । दुसरा उद्धरिला भ्रष्ट द्विज । तिसरा म्लेंच्छ सिद्ध होय सहज । आणि मृत श्वान संजीवन होई ॥३५॥ अठराव्यांत पुन्हां क्षेत्र पंढरपुरांत । शके सतराशें पंचाहत्तरांत । चंद्रभागेच्या महापुरावरुनि यतिनाथ । चालत गेले पादसंवाहनासह ॥३६॥ मोहोळग्रामीं वसती आनंदगुहेंत । तेथील गृहस्थ-पुत्रास प्राणदान मिळत । गवेस्वामी-वृत्त आणि शिल्पकाराप्रत । मल्लारिरूप यतींद्र दाविती ॥३७॥ एकूणविसाव्यांत पिंडब्रह्माण्ड-विवरण । आणि सोलापुरीं सुबराव-मंदिरचे वृत्तकथन । चिंतोपंत टोळ-गृहींचा जाण । भोजन-प्रसंग वर्णिला ॥३८॥ शुष्क सिद्धेश्वर सरोवर- । तटीं लघुशंका करिती यतिवर । द्वितीयदिनीं पर्जन्यवृष्टि भरपूर । होऊनि लोक आनंदले ॥३९॥ मुकुंद मौनीबुवांचे रसाळ आख्यान । तैसेंच अक्कलकोटीं पांडुरंग पुराणिक भाऊराव जोशी जाण । त्यांचे गृहींचे यतिराज भोजनवृत्त कथन । आणि यवन रिसालदार चौल द्विजवृत्त वर्णिले ॥४०॥ विसाव्यांत अक्कलकोट भूपतींची वंशावली । आणि शके सतराशे एकोणऐंशी साली । श्रीस्वामिराजमूर्ति पातली । अक्कलकोट-नगरांत ॥४१॥ अक्कलकोटासभोंवतालची तीर्थें क्षेत्रें समस्त । वर्णिलीं असतीं इत्थंभूत । आणि अक्कलकोट या शब्दाचा विशद अर्थ । परमार्थमार्गें दाविला ॥४२॥ एकविसाव्यांत चौलगृहींचा यतिराजनिवास । आणि नाना चमत्कारी वृद्धिंगत सद्यश । नृसिंहवाडीच्या द्विजाच्या पोटशूलास । करस्पर्शे दूर करिती ॥४३॥ बाविसाव्यांत गुरु-महत्त्व आणि गुरु-शब्दार्थ विवेचन । तैसेंचि मोगलाईंत ग्राम कल्याण । तेथील मनोहर नाईकाचे उदरीं जाण । श्रीदत्त माणिकप्रभु नामें अवतरलें ॥४४॥ तयाचें संक्षेपें चरित्र वर्णन । आणि श्रीस्वामिराजांचे माणिकनगरीं आगमन । त्या समयीं स्वामिराज-आशीर्वचन । आणि प्रसाद लाभ वामनबुवास झाला ॥४५॥ तेविसाव्यांत चिदंबर दीक्षितांचे आख्यान । त्यांच्या यज्ञसमारंभामाजीं यज्ञदत्त ब्राह्मण । आमटीचे हौदीं पडून होई गतप्राण । तो स्वामिराजकृपें संजीवन होई ॥४६॥ चोविसाव्यांत ब्रह्मोपनीदांतील जाण । जें शुद्ध वेदान्त-विज्ञान । तयांचे विस्तृत रीतीनें निरूपण । शिष्यालागीं बोधिलें ॥४७॥ पंचविसाव्यांत प्रारब्ध-प्रयत्न निरूपण । आणि बाबा सबनीस विश्वनाथ वैद्यांचे गमन । माणिकप्रभुस्थानीं स्वामिप्रसादाशीर्वचन । विश्वनाथ वैद्या लाधलें ॥४८॥ नंतर रावजी वैद्यांचे सदनांत । दर्शन देत श्रीमद्दत्तावधूत । पुढें सोलापूराहूनि अक्कलकोटांत । पातले श्रीस्वामिराज ॥४९॥ तदा सत्पुरुष बाबा सबनीस । आणि हरिबाई रामदासीण स्वामिसेवेस । येऊनि वसती पुढे बाबांचा इतिहास । निर्याणादि उल्लेख असे ॥५०॥ सव्विसाव्यांत मुंडी गोसावी गिरी पुरी भारती । यांची स्वामिराज करिती गर्वनिवृत्ती । आणि आळंदीचे स्वामी-नृसिंहसरस्वती । यांचे चरित्र वर्णिलें ॥५१॥ यशवंतराव महादेव देवमामलतदार । आणि नासिकेचे बाबा घोलप द्विजवर । तैसेंचि विष्णुबुवा ब्रह्मचारी आणि काळबुवा संतप्रवर । यांची कथानकें वर्णिली ॥५२॥ सत्ताविसाव्यांत निरुपिलें संन्यासलक्षण । आणि राधागणिकेचे आख्यान । हदरग्रामीं घडलें गोसाव्यास दत्तदर्शन । तैसेंचि सय्यद यवन-चरित्र वर्णिले ॥५३॥ अठ्ठाविसाव्यांत इचलकरंजीकर ब्राह्मण । श्रीपादभटाचें सुरस आख्यान । बाबा फडणीस, काशीनाथ म्हसवडे यांलागून । चमत्कारें अनुताप जाहला ॥५४॥ तैसेंचि बंबगार्डन साहेबांचे चरणदुःख । दूर झालें तात्कालिक । वाणी पावला मन्याबा मूक । श्रीस्वामिराजकृपेनें ॥५५॥ एकूणतिसाव्यांत 'उपादान'कारण-निरूपण । आणि काशीकर बहिरेशास्त्री यांचे आख्यान । तैसेंच पैठणकर नथुराव विदुराचें जाण । संकट दूर होय स्वामिकृपें ॥५६॥ शके सतराशें अठ्याण्णवाचे दुष्काळीं । दत्तजयंती खर्चाची पंचांसि चिंता पडली । परी शंकरराव विदुरें आणि एका सावकारें तत्काली । येऊनि समारंभ थोर केला ॥५७॥ बीड-पत्तनचा गुर्जर नागर ब्राह्मण । नारायणदास स्वामिनिंदक जाण । तयासि स्वामिरायें चमत्कार दावून । कृपा केली तयावरी ॥५८॥ तिसाव्यांत देशकालवस्तुपरिच्छेद-निरूपण । आणि हैद्राबादच्या शंकररायराजे यांचे आख्यान । त्यांनीं समर्थांचा विशाल मठ बांधून । मोरोपंत म्हैसकर पूजारी नेमिलें ॥५९ तैसेंचि हट्टी संन्याशाचे घडलेलें वृत्त । आणि रामदास गणपतराव दत्तंभट । बाबा सबनिसादिकांचा उल्लेख होत । परमार्थाधिकारी म्हणूनि ॥६०॥ एकतिसाव्यांत गोविंदभट जोशी यांचे चरित्र । आणि राचप्पाचा स्वामिकवनपर वृत्तांत । तैसाच तैलंगद्विज आणि माधवाचार्याचा रसयुक्त । कथाभाग वर्णिला ॥६१॥ बत्तिसाव्यांत रहिमतपूरचे आप्पासाहेब माने सरदार । तत्कन्या जमनाबाई महाराणी चतुर । यांचे वर्णिलें इतिहाससार । आणि सुंदरी नामक वानरीचें ॥६२॥ तैशीच दिनकरराव आनंद नवरोजी पारशीची हकीकत । आणि श्रीमद्दत्तावधूत स्वामिरायांप्रत । श्रीमंत मल्हारराव महाराज गायकवाडकडील पाचारणवृत्त । इत्थंभूत वर्णिलें ॥६३॥ तेहतिसाव्यांत विठ्ठल तिर्गुळ आणि ठाकूरदासबुवांचे वृत्त । तैशीच त्रिविक्रमयति आणि रामाचार्याची हकीकत । लालासाहेब आणि मुंबईकर भाऊ रसूल भक्त । यांची रसाळ चरित्रें वर्णिली ॥६४॥ चौतिसाव्यांत माया-प्रपंचमिथ्यात्व-विवेचन । आणि महारूद्रराव देशपांड्यांचे चरित्र-वर्णन । श्रीमंत जयाजीराव शिंद्यांचे धीपुरीं आगमन । तैसेंचि श्रीमंत तुकोजीराव होळकरांचेही ॥६५॥ बेलापुरचें केशव-गोविंदस्थान । तेथील प्रख्यात संन्यासी महान । आणि हंसराजयोगी परम सज्जन । स्वामिदर्शनार्थ येती धीपुरीं ॥६६॥ पस्तिसाव्यांत श्रीमद्दत्तावधूत निरंजन । यांचे मठसंस्थानादि-स्थापन । सभामंडप-चरणपादुकादि-वर्णन । आनंदगुहेसहित ग्रंथियलें ॥६७ छत्तिसाव्यांत मायेचें स्वरूप विवेचन । गणपतराव हुकिरे आणि गजेंद्रचरित्र वर्णन । बाबा यादव तैसा तेरढोकीचा बाळाप्पा ब्राह्मण । यांची कथानके ग्रंथियली ॥६८॥ सदतिसाव्यांत मायेच्या चतुरर्थाचे निरूपण । आणि एकेकालीं अनावृष्टीमुळें गांजले जन । तदा खासबागेतल्या विहिरींत चणक फेकून । स्वामिराज उदक उत्पन्न करिती ॥६९॥ याच विहिरीचें उत्तम जळ । लोहयंत्रे लावुनि नळ । विठ्ठल टिकाजींनी लोकांसि विपुल । मिळण्याची योजना केली ॥७०॥ हैद्राबादच्या यवन शिपायाचा चमत्कार । आणि रामशास्त्री बडोदकरासि यतिवर । कार्तिकस्वामीरुपे दर्शन देऊनि साचार । तयांची मनकामना पुरविती ॥७१॥ मुंबईकर हरिभाऊ भक्ताचे रसाळ आख्यान । आणि नगरचे नाना रेखी, भाऊ जोशी यांचा उल्लेख जाण । सोलापुरच्या गणेश बल्लाळें स्वामिचरित्र छापवून । प्रख्यात केलें सर्वत्र ॥७२॥ मुंबईचे बळवंत भेंडे रोगें क्षीण । ते स्वामिरायास येति शरण । तयांस प्रसाद आशीर्वचन ।  देऊनि अर्पिती आरोग्य ॥७३॥ अडतिसाव्यांत ईषणास्वरूप-विवेचन । आणि गुरुसिद्धाप्पांचे आख्यान । रामाचार्यादि वैष्णवां स्वामी-सच्चिदघन । परीक्षा चमत्कार दाविती ॥७४॥ तैसेंचि रामाचार्य-स्त्रीचें व्याधि-निरसन । आणि मदार जमादाराचे शासन निवारण । हदर आणि उंबरसगी ग्रामींचा जाण । पर्जन्य चमत्कार वर्णिला ॥७५॥ एकूणचाळिसाव्यांत आत्म्याचें शुद्ध स्वरूप निरूपण । आणि नंदराम सुंदरजीचें मूत्रकृच्छ्र व्याधि-निरसन । तयास शिवलिंगस्थानीं आणि मंचकीं जाण । एकाच कालीं यतींद्र दर्शन देती ॥७६॥ तैसेंच भार्येसह आप्पासाहेब हसबनिसालागून । पिशाच्चसंबंध लागला दारुण । तो दूर होय स्वामिराज-कृपेंकरुन । आणि सुंदर कन्यारत्नही लाधे ॥७७॥ श्रीसमर्थांच्या शिष्यवृंदांचा उल्लेख जाण । तैसेच वामनबुवांच्या तीर्थयात्रा आणि अक्कलकोटीं गमन । तेथें घडलेल्या स्वामिलीला आणि संपूर्ण । गोविंदराव मोहित्यांचे वृत्त वर्णिलें ॥७८॥ चाळिसाव्यांत आत्मस्वरूपानंद-विवेचन । तैसेंचि मोरोपंत बापट आणि गोविंदपंत कुळकरण्याचें निरूपण । आणि एका दत्तजयंतीस महर्गतेसमयीं जाण । तीनशत पात्रान्नांत चतुःसहस्त्र पात्रें जेविलीं ॥७९॥ माघ वद्य गुरुप्रतिपदेसमयीं । विप्रभोजन- वेळीं मार्गांत पाहीं । वृषभ भडकूनि उदक रथ उलथून जाई । परी स्वामिराजकृपें संकट टळे ॥८०॥ तैसेंचि आणखी एका घरी गुरुप्रतिपदा-दिनीं । जंगमाचे वापीतील जल आटले असूनि । कांठीं स्वामिरायें लघुशंका करितांक्षणीं । वापी तुडुंब भरलीसे ॥८१॥ एकेकालीं वामनबुवा वैद्य असतां बडोद्यासि । शरीरव्याधीनें त्रासून मध्यरात्रीसी । सुरसागरीं गेले जीव देण्यासि । परी स्वामिरायें प्रगटूनि प्रसंग टाळिला ॥८२ आणखी एका दत्तजयंतीस । महर्गतेमुळें विप्र-भोजनाची चिंता पंचांस । ती स्वामिराजकृपेनें खास । एका भक्तें येऊनि दूर केली ॥८३॥ त्यासमयी मराठे जातीची एक वृद्ध बाई । पतीसह पातली ते ठायीं । तियेसि श्रीफल आशीर्वाद अर्पितां पाहीं । एका वर्षांत पुत्ररत्न लाधलें ॥८४॥ एकेचाळिसाव्यांत स्वरूप आणि तटस्थ-लक्षण । आणि लक्ष्मण कोळी खलाशाचें जहाज तरण । एक मारवाडी भक्त आणि निर्धन द्विजालागून । यतिराज अस्थिरुपें सुवर्ण अर्पिती ॥८५॥ नर्मदातीरचे ब्रह्मानंद साधु सत्त्वस्थ । आणि हैद्राबादच्या विठ्ठल जमादारचे वृत्त । तैसेंच श्रीशंकराचार्यांचे आगमन अक्कलकोटांत । होय तो अपूर्व कथाभाग वर्णिला ॥८६॥ द्विजविधवा चिमेचें वापीतरण । आणि शूद्र गोविंदा वेड्याचे विक्षिप्ताचरण । त्यापरी मुंबई-पुण्याच्या सुधारकालागून । दर्शन-चमत्कार दाविला ॥८७॥ बेचाळिसाव्यांत लक्षण अनुवाद आणि विधिरूप श्रुत्यर्थ कथन । तैसेंचि केसेगांवच्या अप्पा पाटलाचे रसाळ वृत्त कथन । आणि अक्कलकोटानजीकच्या आंबेवाडींत तस्करांलागून । समर्थें महाभुजंग पाठीं लावून पळविलें ॥८८॥ त्या स्थलीं कोल्हापुरच्या राजपत्नी श्रीमंत खाशीबाई । आणि बडोद्याच्या किल्लेदारपत्नी श्रीमंत बबई । उभयतांचे लवाजम्यानिशीं आगमन होई । तो कथाभाग वर्णिला ॥८९॥ तैसेंच अदुलपुरचे देशपांडे जहागिरदार । तयांस स्वामिकृपे पुत्र-कन्याप्राप्ति साचार । आणि मलु गौळ्याचा दुग्ध कापट्यप्रकार । जाणूनि यतिराज चमत्कार दाविती ॥९०॥ त्रेचाळिसाव्यांत देहादिक प्रपंचाचे मूळ आणि बीज कारण । तैसेंच कथिलें तात्यासाहेब सांगलीकरांचे गर्वनिरसन । आणि जप्त झाल्यामुळें अक्कलकोट-संस्थान । मालोजी भूप सोलापुरीं गेलेले ॥९१॥ तेथें घडे यतींद्र-गमनोत्साह मनोरम । त्यांत एक निंदक चनबसाप्पा नाम ।त्यास उमारमणरूपें यति परंधाम । दर्शन देऊनि स्वभक्त करिती ॥९२॥ श्रीस्वामिरायांच्या कृपेंकरुन । मुक्त झालें अक्कलकोट संस्थान जप्तींतून । नंतर मालोजीभूप होऊन हर्षायमान । अक्कलकोटीं पातले ॥९३॥ या संस्थानचे रीजंट । श्रीमंत दादासाहेब विंचुरकर श्रेष्ठ । तयांचा कुष्टरोग होय नष्ट । श्रीयतिराजकृपेनें ॥९४॥ चोळाप्पाचा कुटुंबविस्तार-कथन । आणि मणूरच्या महापुरींचें नौकाआरोहण । आण्णा पाटलाच्या पुत्रासि महामारी उपद्रवापासून । कृपाळूपणें श्रीस्वामिराज वांचविती ॥९५॥ चव्वेचाळिसाव्यांत हृदयकमल-ध्याननिरूपण । आणि नळदुर्गींच्या नाईकाचें लोभिष्टपण । जकप्पा स्वामींच्या पुण्यतिथीसमयीं जाण । यतींद्र चमत्कार दाविती ॥९६॥ वामन राजाराम घोलप पुणेकर । आणि बऱ्हाणपुरचे मोरेश्वर हरी नागर । यांची संकटें होती दूर । श्रीस्वामिराजकृपेनें ॥९७॥ मोरेश्वरा दत्तात्रेय-नामें पुत्र प्राप्त । आणि मल्लिकार्जुन जंगम कीर्तनकाराप्रत । गर्वहत करुनि तत्कन्येचा गर्भ श्रीसमर्थ । वृद्धिंगत करिती तीन वर्षांचा ॥९८॥ पुढें मल्लिकार्जुन श्रवणमासभरी । विप्रभोजन घाली परमादरीं । श्रीस्वामिराज असूनि प्रज्ञापुरीं । बारशीसही तदगृहीं होते ॥९९॥ पंचेचाळिसाव्यांत याज्ञवल्क्य-जनक-संवादनिरूपण । आणि यात्रेकरी गोसाव्याचा जलोदर व्याधि होय निरसन । तयास श्रीगुरु द्वारकाधीशाचें रूप दावून । दर्शनहेतु पुरविती ॥१००॥ पांडुरंग सोनारें कर्णकुंडलें अर्पिल्याचा चमत्कार । आणि अनावृष्टि-समयीं पर्जन्यवृष्टि करविती यतीश्वर । जुन्नरच्या शूद्र सकूबाईचा कुष्ट दूर । होय श्रीसमर्थकृपेनें ॥१०१॥ तैसेंच जुन्नरचे कृष्णाजी लक्ष्मण काळविट । तयावरी श्रीसमर्थकृपा होत । आणि भिकोबा चित्र्यास पुत्रसंतान प्राप्त । यतींद्र-प्रसादें होतसे ॥१०२॥ जुन्नरकर राजाराम नीलकंठ । आणि महादेव रघुनाथ गोडबोले गृहस्थ । सरसचे लक्ष्मीनारायण स्वामिभक्त । आणि लिंबडीचे जयशंकर पुरुषोत्तम ॥१०३॥ लक्ष्मण माधव आपटेकर । उमियाशंकर मूळजी भाविक नर । चतुर्भुज जेठा आणि जिऊबा वामन पवित्र । इत्यादि स्वामिसेवक असती ॥१०४॥ आणि लखतरची  गंगाबाई । काशी जानकी धाकू लक्ष्मी आदिक पाही । निष्ठापूर्वक श्रीसमर्थपायीं । शरण होती अनन्य ॥१०५॥ सेहेचाळिसाव्यांत कौषीतकी-उपनिषदांतील जाण ।पर्यन्क-विद्यारूप अहंग्रह-उपासना वर्णन । नळदुर्ग तालुकादार बैरामजीचें निरूपण । आणि गायक पुराणिकांचा वृत्तांत वर्णिला ॥१०६॥ सत्तेचाळिसाव्यांत गौतमऋषीकृत जाण । न्यायशास्त्र-पदार्थ-निरूपण । वामनबुवा नासिक-त्र्यंबक-सप्तशृंगालागून । जाती शके सतराशें त्र्याणवांत ॥१०७॥ सप्तशृंगीदेवी मुखींचा वामनबुवास । कृपयुक्त तांबुल-प्रसाद मिळे खास । पुढें सटाण्यास यशवंतराव-साधुदर्शनास । गमन करिती वामनबुवा ॥१०८॥ पुन्हां सप्तशृंगास येऊन केलें देवीपूजन । आणि नासिकास घेतलें गंगोदक भरून । नंतर पंढरीस जाऊन श्रीविठ्ठल-दर्शन । घेतां विटेवरी श्रीस्वामिराज दिसती ॥१०९॥ त्याउपरी धीपुरीं येऊनि जाण । वामनबुवांनी समर्थांस घातलें गंगास्नान । इत्यादि इतिहास आणि कानफाट्याचें उद्धट वर्तन । तैसेचि वारकरी द्विजवृत्त निवेदिलें ॥११०॥ पंढरीनाथ गणेशाचा स्वार्थपर इतिहास । आणि मोरोबा कुळकरण्याची स्त्री त्रासूनि उदार-दुःखास । जीव देतां यतींद्रें वाचवूनि व्याधीस । दूर केल्याचें वृत्त ग्रंथियले ॥१११॥ अठ्ठेचाळिसाव्यांत जैमिनीकृत पूर्वमीमांसेचा उल्लेख । आणि तान्ही-गणिकेचें कथानक । कोनळी ग्रामींच्या रानीं असतां यतींद्रतिलक । अन्नपूर्णादेवी अन्न पुरवी ॥११२॥ मालोजी भूपास गव्हर्नरसाहेबांकडून । शस्त्र-परवाना मिळाल्याचें कथन । आणि लोकांचे पिशाच्च-संबंधादि-व्याधिनिरसन । तैसाच मूषकप्राणदान-कथाभाग ॥११३॥ शके सतराशें पंचायशींत वामनबुवांस । पयोनदी-संगमीं घडे महामंत्रोपदेश । ब्रह्मनिष्ठ होशील ऐशा आशिर्वादास । यतींद्रतिलक अर्पिती ॥११४॥ पुढें वामनबुवा गाणगापुरास । करिती गुरुचरित्रापारायणास । तेथुनि येऊनि धीपुरास । प्रसादाज्ञा घेऊनि वामोरीस जाती ॥११५॥ एकूणपन्नासाव्यांत मोक्षार्थ धन-अकारणता-निरूपण । आणि प्रज्ञापुरीच्या भूपतीचें कथन । पिराजीराव टिकाजींस श्रीविठ्ठलरूपें दर्शन । देती यतिराज कृपालुत्वें ॥११६॥ तैसाचि विठ्ठलराव टिकाजींचा अभ्युदय । अक्कलकोट दरबारीं होय । बसाप्पा तेली आणि कोकणस्थ द्विज दंपत्य । यांचा इतिहास वर्णिला ॥११७॥ बडोद्याचे भाऊ खेडकर । आणि घोरपडे राजे सरदार । सातारा प्रांतींचा पांडुरंग केशव विप्र । यांची कथानकें ग्रंथियलीं ॥११८॥ पन्नासाव्यांत मलत्रयरूप योनिज शरीर-निरूपण । आणि अहंकारी पांच वैष्णव ब्राह्मण । त्यांचा दर्प उतरिला जन्मांध-द्विजपुत्राकडून । तयास नेत्र आणि ज्ञान अर्पूनि ॥११९॥ एकावन्नाव्यांत मृत्यू आणि संन्यास प्रकरण । तैसेंचि वामनबुवांचे धीपुरीं गमन । गुरुदर्शनार्थ चंद्रस्वर उक्त जाणून । सव्य नासिकेंत बोळा बसविती ॥१२०॥ तयांचे निराकरण यतिराज करिती । पुन्हां दुसरं वर्षीं प्रज्ञापुराप्रति । वामनबुवा जातां परीक्षणार्थ सद्गुरू रागावती । नंतर सुदयें करिती योगप्रश्न-समाधान ॥१२१॥ बावन्नाव्यांत गर्भोपनिषदांतील जाण । शरीरव्यवस्था-विचाराचें निरूपण । विस्तारपूर्वक केलें ग्रंथन । मुमुक्षूंलागीं कळावया ॥१२२॥ त्रेपन्नाव्यांत राजयोग-कथन । आणि दारिद्र्यास अस्थिरुपें प्राप्त सुवर्ण । तैसाचि गलितकुष्ट शूद्राचा व्याधि निरसन । होय श्रीसमर्थकृपेनें ॥१२३॥ पुढें त्याच शूद्राचे गृहीं । गुरुपादुका- स्थापनसमयीं । सदगुरु अकस्मित प्रकटती पाहीं । आणि धीपुरींही असती ॥१२४॥ चोपन्नाव्यांत ब्रह्मसाक्षात्कारार्थ त्याज्य विषय । तयांचे निरूपण केलें यथायोग्य । बावडेकर पुराणिकाची व्यय अडचण दूर होय । श्रीस्वामिसमर्थकृपेनें ॥१२५॥ ताबूत पाहण्यास समर्थाज्ञा नसतां । भुजंगा श्रीपादासह गेला न कळतां । गर्दीत सुवर्ण जोडवें हरवतां । धाकूजी फौजदाराजवळ सांपडे ॥१२६॥ खेडमणूरच्या मार्गांत । मेणा वाहण्याची अडचण होत । तदा श्रीस्वामिराज समर्थ । पुष्पवत् सूक्ष्म होती ॥१२७॥ वाडी-ग्रामीं भोजनाची अडचण । तदा आकस्मित् महारुद्र देशपांडे भोजन । समारंभ चांगला करून । संतोषविती सर्वांसि ॥१२८॥ तेथें देवीचें होतें अत्युग्र स्थल । चोळाप्पास उपद्रव झाला तात्काल । शके सतराशें नव्याण्णव अश्विन शुक्ल । नवमीसि चोळाप्पा गेले निजधामा ॥१२९॥ थोरल्या राजपत्नीचें देहावसान । आणि महांतनळी ग्रामी घडे चोरी जाण । तैशीच द्विजस्त्रीची घागर तलावांत लोटून । यतींद्रें दिधली तो चमत्कार वर्णिला ॥१३०॥ पंचावन्नाव्यांत अपौरुषेय वेद-कथन । आणि जंगम-शिवलिंग-होमवर्णन । वेणीमाधव वैद्यांस यतींद्र नारायण । पूगीफल प्रसाद अर्पिती ॥१३१॥ नीलेगांवी श्रीसमर्थांचें गमन । आणि श्रीसमर्थसमाधिवृत्त निरूपण । समाधीनंतर पंचम षष्ठदिनीं जाण । नीलेगांवीं भाऊसाहेबांस पुनर्दर्शन घडे ॥१३२॥ या अध्यायीं होय ग्रंथलेखन पूर्ण । आणि वामनबुवा वैद्यांचे निर्याण । नंतर ग्रंथसंशोधन-उपसंहारलेखन । विनायक सदाशिव-हस्तीं घडे ॥१३३॥ येणेंपरी हे अध्याय पंचावन्न । यांतील ज्ञानामृत-पान । सद्भावें करितां मुमुक्षुजन । परमार्थ-सुखा लाधती ॥१३४॥ ही पंचावन्न अध्यायमयी रत्नमालिका । मुमुक्षुकंठी विलसो देखा । तेणें पावती परमार्थसुखा । सत्य सत्य त्रिवाचा ॥१३५॥ इति श्रीगुरुलीलामृते । ब्रह्मनिष्ठ-वामनविरचिते । विनायक सदाशिव-संशोधिते । अवतरणिकानाम अध्याय: ॥१३६

॥ श्रीसद्गुरू स्वामीराज चरणारविंदार्पणमस्तु 

स्वामीभक्तहो, ब्रह्मनिष्ठ वामन रावजी वैद्यरचित संपूर्ण श्रीगुरुलीलामृत अर्थात श्री अक्कलकोट स्वामी समर्थ चरित्र इथे वाचू शकता. 

॥ श्री स्वामी समर्थ      

                                                                             

Apr 14, 2021

श्रीगुरुलीलामृत भावानुवाद


 श्री गणेशाय नम  द्रां दत्तात्रेयाय नमः 

॥ श्री स्वामी समर्थ 

श्री दत्तप्रभूंचा अवतार असलेलें अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ यांच्या भक्तगणांत अलोट मान्यता लाभलेला ग्रंथ म्हणजे ब्रह्मनिष्ठ वामन ( वामनबुवा ) रावजी वैद्य रचित श्रीगुरुलीलामृत ! या ग्रंथाच्या नित्य पठणें । सर्व सिद्ध निःशंक होतें श्रवणें । गृहीं हा ग्रंथ संरक्षणें । दत्तदर्शन होईल ॥ अशी निश्चित प्रचिती देणारा हा अलौकिक ग्रंथ प्रामुख्याने श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरित्रावर आधारित आहे. ह्या दिव्य ग्रंथाच्या लेखनाच्या प्रेरणेविषयीं आत्मनिवेदन करतांना ब्रह्मनिष्ठ वामनबुवा म्हणतात - हें नाहीं नाहीं स्वकपोलकल्पित । वेदशास्त्रपुराणार्थरहस्यमथित । हृदयस्थ परमात्मा दत्तावधूत । त्यांचे तेचि वदविती ॥ अर्थात हा सिद्ध ग्रंथ स्वकपोलकल्पित नसून प्रत्यक्ष श्री दत्तप्रभूंनीच लिहून घेतला आहे. 

पंचावन्न अध्याय आणि ९७५८ ओव्या असलेल्या ह्या ग्रंथात धर्म, मीमांसा, व्याकरण, न्याय, ज्योतिष, वैद्यक आदि अनेक शास्त्रांचे सविस्तर विवेचन केले आहे. त्याखेरीज, श्रुति, स्मृति, पुराणे, वेद-उपनिषदें यांतील अनेक श्लोक-वचनेंही प्रतिपादित केली आहेत. श्रीगुरुलीलामृत या चरित्र ग्रंथात प्रत्येक अध्यायाच्या प्रारंभी वेदान्तातील काही प्रमेयांचे विश्लेषण आहे, तदनंतर त्याच अनुषंगाने श्रींच्या भक्तांच्या कथा आल्या आहेत. 

' भावेन विद्यते देव: ' या स्मृति वचनावर विश्वास ठेवून भाविकांनी या प्रासादिक ग्रंथाचे वाचन केल्यास श्री स्वामी समर्थांच्या कृपेची अनुभूती अवश्य येतेच. ही ग्वाही देतांना ग्रंथकार लिहितात - नित्यश: एक अध्याय तरी । सद्भावें वाचावा निर्धारीं । तयाचे सकल मनोरथ पूर्ण करी । श्रीसद्गुरुस्वामी निश्चयें ॥

स्वामीभक्तहो, ब्रह्मनिष्ठ वामन रावजी वैद्यरचित संपूर्ण श्रीगुरुलीलामृत अर्थात श्री अक्कलकोट स्वामी समर्थ चरित्र इथे वाचू शकता.   

 श्रीगुरुलीलामृत या ग्रंथाचा भावानुवाद इथे उपलब्ध आहे.

  ॥ श्री स्वामी समर्थार्पणमस्तु ॥


Jun 28, 2020

संक्षिप्त श्रीगुरुलीलामृत - अध्याय १




|| श्री गणेशाय नमः || श्री सरस्वत्यै नमः || श्रीमत्सद्गुरू दत्त दिगंबराय नमः || श्रीगुरूदेव दत्त स्वामी महाराजाय नमः ||

प्रारंभी श्री मंगलमूर्ती । ज्याचे योगे स्फूरे चैतन्य स्फुर्ती । ब्रह्मादिक देव असूर नर जया वंदिती । त्या नमियेले आदरे ।। १ ।। गजानन हेरंब लंबोदरा । विघ्नांतका सर्व विद्या सागरा । ग्रंथ सिद्धिसी नेऊनि दातारा । पूर्ण करा सविस्तर ।। २ ।। आता भगवती सरस्वती । अनादिविद्या चित्छक्ती । जियेचे योगे स्फूरे अंतःकरणवृत्ती । ते वंदिली प्रेमभावे ।। ३ ।। अक्षरस्वर्ण वीणा शोभत । करी पोथी वेदार्थ विहित । विरागे प्रबोध गायन करित । कल्याणार्थ जगताच्या ।। ४ ।। ॐ नमः श्रीसद्गुरूनाथा । श्रीगुरूदेवदत्त स्वामी समर्था । पूर्णब्रह्म केवल अनादि यथार्था । आपणचि एक अद्वितीय ।। ५ ।। खल दुष्टांचे निर्दलन । व्हावया साधूंचे परित्राण । धर्मसंस्थापनार्थ अवतीर्ण । होता युगायुगी जगदीशा ।। ६ ।। दुराचरण घोर कलियुगी । होऊ लागले जागोजागी । म्हणून श्रीपादवल्लभ रूप धरूनी जगी । सदाचारी जन लाविले ।। ७ ।। मागुती श्रीमन्नृसिंह सरस्वती । अवतरले नरवेषे यति । जनांसि लावूनि सद्धर्म निती । असंख्यात तारिले ।। ८ ।। या अवतार द्वयांचे चरित । प्रसिद्ध ' गुरूचरित्र ' ग्रंथात । सरस्वती - गंगाधरे इत्थंभूत । वर्णिले आहे सुरस ते ।। ९ ।। जगदोध्दारार्थ महीवरी संचार । करिती स्वच्छंदे गुरू नृसिंह यतीश्वर । हिमाचल जगन्नाथ हरिद्वार । अपार तिर्थे हिंडून ।। १० ।। तेचि परमात्मा नृसिंह सरस्वती । सोलापूरहूनि स्वच्छंदे पादगती । जगदुध्दारणार्थ अक्कलकोटाप्रति । तिष्ठले वर्षे एकवीस ।। ११ ।। पूर्वी अत्रिऋषिंनी उग्र तप । कुलाद्रि पर्वती स्त्रीसह अमूप । केले शतवर्ष सानुताप । पुत्र प्राप्त व्हावया ।। १२ ।। वाहे ' निर्विध्या ' नदी नामे । सुगंधिक स्तबक कुसूमे । तेथे वृक्षातळी बोधोपरमे । पत्नीसह ऋषि वसती ।। १३ ।। अत्रिऋषिंच्या सदनी । तेव्हा प्रवेशिले नारद मुनी । ऋषिने बसवूनी आसनी । केले पुजन देवर्षिंचे ।। १४ ।। अनसुया करी घेऊनी मुसल । कांडित होती तंदुल । तदा अत्रिऋषि मागती जल । तृषाकूल जाहले ।। १५ ।। पतिसेवा आज्ञा तत्पर । मुसल थांबवले वरचे वर अधर । सुगंध शुद्धोदक रूचिकर । दिधले सुपात्री आणूनी ।। १६ ।। जल प्राशुनी अत्रिमुनी शांतले । पाहूनी नारदास आश्चर्य वाटले । धन्य पतिव्रता - सामर्थ्य चांगले । ठेविले मुसल अधर हे ।। १७ ।। नारद मुनी विचारिती । आता करावी सुलभ युक्ति । लक्ष्मीस निवेदावी सतिख्याति । वैकुंठाप्रति जाऊनी ।। १८ ।। या त्रैलोक्यांत कोठे असती । आम्हांसम कोण स्त्रिया सुसती । नारदा हे यथा मति । विदित व्हावे आम्हाला ।। १९ ।। तो कलहप्रिय वदे तया । ब्रह्मांडामाजी एक अनसूया । महासाध्वी आदिमाया । सर्वेापमे विराजे ।। २० ।। तृषाक्रांत मुनी एकवेळ । म्हणती आणावे स्वच्छ जळ । सती कांडित होती तांदुळ । ठेविले अधर मुसळ ते ।। २१ ।। नारद म्हणे मी पाहिले प्रत्यक्ष । सत्य शपथ परमेश्वर साक्ष । पतिव्रता अनसूया दक्ष । साक्षात्कारी विशेष ।। २२ ।।नावासारखी करणी एक । ' अनसूया ' नाम सार्थक । बोले तैसे वर्ते सम्यक । असूयाविरहित सर्वदा ।। २३ ।। उमारमासावित्रीस । क्षोभविले लावूनी कलहास । नारद नाचे करी हास । सुस्वर सूरस गायने ।। २४ ।। नारद लावूनी गेले कळी । इकडे सक्रोधे तिघी तळमळी । खेदे गेल्या आपल्या स्थळी । परी काही सूचेना ।। २५ ।। कमलोद्भव कांतेसी म्हणे । तिळमात्र चिंता न करणे । ऐशा सती एक क्षणे । भस्म करीन पुष्कळ ।। २६ ।। वदे शंभूसी उमारमणी । न साहवे अनसूयेची करणी । काय भार मशक चिमणी । दग्ध करू क्षणात ।। २७ ।। मुख्य कलहाचे जनन । नारदाचे आगमन । अंतर्साक्षी जनार्दन । मधुसूदन समजले  ।। २८ ।। म्हणती ऐशा अनेक सती । निमिषांत धाडू यमलोकाप्रति । प्रिये असावी आनंदवृत्ती । चित्ती क्षोभ कशाला ।। २९ ।। ब्रह्मा विष्णू महेश्वर । एकत्र झाले तदनंतर । सती छळणाचा विचार । स्त्रीबुद्धीने मांडिले ।। ३० ।। ब्राह्मण रूपे त्रिवर्ग । भूमंडळी चालले भर्ग । स्त्रीबुद्धीने सती अपवर्ग । करू म्हणती क्षणार्धे ।। ३१ ।। अनसूया साध्वी प्रमुख । जाऊ न देती अतिथीस विन्मुख । करविती प्रेमे प्रसन्नमुख । यथोप्सित अर्पुनी ।। ३२ ।। ऐशा पुण्याश्रमी अतिथी त्रय । येऊनि वदती क्रोधमय । इच्छाभोजन क्षुधार्त प्रिय । द्यावे शिघ्र आम्हासी ।। ३३ ।। जरी तू साध्वी सत्य अससी । होऊनी विगत वसनेसी । वाढावे आम्हा भोजनासी । अनसुयेसी वदती ते ।। ३४ ।।ऐकूनि अतिथींची भाषणे । द्विजवरांसी साध्वी म्हणे । नग्न स्त्री पाहून होणे । काय लाभ तुम्हासी ।। ३५ ।। परकांतेचा समागम । मदांध जे विषयकाम । महारौरव नरकी आराम । पावती बंधन सकळ ते ।। ३६ ।। तुम्ही अतिथी अभ्यागत । भोजन समयी शुद्ध चित्त । असावे हे शास्त्रविहित । पहा निश्चित विचारे ।। ३७ ।। तुमचे भाषण सत्य सुरस । बोध शास्त्रार्थ नको आम्हास । वांच्छा मनी विगत - वास । वाढा म्हणती अतिथी ते ।। ३८ ।। नातरी घेऊन जाऊ सत्त्व । आम्हासी कळते धर्मतत्त्व । सतीस वाटले नवल कर्तृत्व । आले दैवत छळावया ।। ३९ ।। त्रिकालज्ञानी अत्रि-ऋषी । ब्रह्मविद्वर योगवशी । अंतरी देखिलें विधिहरिहरांसी । आलें छळणासी आश्रमीं ।। ४० ।। निजदैवत तीर्थ करून । अतिथींवरी केले सिंचन । तव ते तात्काळ बाले तीन । गोजिरवाणी जाहली ।। ४१ ।। विगत - वसन होऊनी सती । घेतली बालके अंकावरती । तो स्तनी दुग्धधारा सुटती । मग ते पाजिती लेकरा ।। ४२ ।। नेसुनी सतीने वस्त्र चांगले । ध्वजा तोरण उभारविले । गीत वाद्ये गर्जती भले । कोंदाटले नभ सुमूदे ।। ४३ ।। उभयतांसी परमानंद । दाटला प्रकटले करूणाकंद । ईश्वरे पूर्ण केला छंद । त्रयनंदन देऊनी ।। ४४ ।। पुढे काय नवल वर्तले । अकस्मात् नारद पातले । पाहूनि त्रैमुर्ती झाली बाले । देवर्षि हासले गदगद ।। ४५ ।। मग नारद गेले देवलोकी । सुरवर स्त्रियांसी एकाएकी । कोठे गेले विधि - हर - पिनाकी । म्हणती सांगा की माय हो ।। ४६ ।। सावित्री - उमा - रमा त्रिविध । नारदासी विनविती बहुविध । बहुत दिवस न पतीचा शोध । सांगा विदित असेल ते ।। ४७ ।। तुमचे पति अत्रि आश्रमात । बाल होऊनी लोळती पाळण्यात । नारदमुखे आश्चर्यवृत्त । श्रवणे झाल्या सक्रोध ।। ४८ ।। नारदे ऋषि आश्रम दाविला । तिघी म्हणती आत चला । जाऊनी पाहिले बालकांला । अंगी संचारला बहु क्रोध ।। ४९ ।। अनसुयेसी वदती तिघी जणी । शाबरी मंत्र निशीदिनी । बैसूनी जपतीस विजनी । इंद्रजालिके काय गे ।। ५० ।। बहुरूपी तुमचे पती । विदित असूनि क्षोभवृत्ती । जरी आहा मोठ्या सती । कळकळ तळमळ कशासी ।। ५१ ।। स्वपती नोळखिता तुम्ही । वृथा करिता तुम्ही आम्ही । जरी असाल साध्वी काही । न्यावे ओळखून पतींते ।। ५२ ।। निजपतीस ओळखित नसल्या । त्या म्हणाव्या पतिव्रता कसल्या । पतिधर्मी न गेल्या कसल्या । असल्या काय कामाच्या ।। ५३ ।। मग सावित्री लक्ष्मी उमा । त्यागुनी राग गर्व रिकामा । अज्ञाने नेणो आपला महिमा । म्हणती क्षमा करा हो ।। ५४ ।। पातिव्रताधर्म निपुण । अनसूया जगन्माता आपण । आलो अनन्य-एक शरण । द्यावे दान पतींचे ।। ५५ ।। अनसूया सती अलौकिक । दुग्ध परम पुरुषार्थदायक । आत्मतृप्त्यर्थ पिती सान बालक । अघटित कौतुक मायेचे ।। ५६ ।। हा पुत्रसोहळा पाहण्यासाठी । विमानांची झाली दाटी । अत्यादरें स्वर्णपुष्पवृष्टी । सुरवर करिती अखंड ।। ५७ ।।  मार्गशीर्ष शुक्लपक्षी । भूतातिथी मंदरोहिणी ऋक्षीं । त्रैमूर्ति हे सायान्ही सुराध्यक्षीं । अंतर्साक्षी जन्मले ।। ५८ ।। ब्रह्मावतार तो 'सोम' । रुद्रावतार 'दुर्वास' नाम । विष्णुस्वरूप 'दत्त' परम । सर्वांसी मान्य योगीश्वर ।। ५९ ।। अनसुया वदे हो सुरांगना । यथा पालिते त्रयनंदना । मी सासू तुम्ही सूना । सुखे नांदा श्वशुरगृही ।। ६० ।। देवस्त्रिया वारंवार नमिती । कृपा करून द्यावे दान पति । ऐकूनी सतीने तीर्थसिंचने मागुती । केले पुरूष पूर्ववत् ।। ६१ ।। हे पाहूनी सर्वांसी वाटले आश्चर्य । म्हणती धन्य धन्य सती ऋषिवर्य । नारद वदे साधले कार्य । अमरात्रय झाले एकत्र ।। ६२ ।। मग त्रैमुर्ती वदती नारदा । आमचे अभेदत्वे दैवी संपदा । विशुद्ध सत्त्वैक विलोकी सर्वदा । दत्त परमेश्वर स्वरूप ।। ६३ ।। तुझेनि मिषे जगतासी परम लाभ । योगी परम भास्कर स्वप्रभ । दत्तजयंती उत्साह समारंभ । करा आरंभ प्रतिवत्सरी ।। ६४ ।। इति संक्षिप्त श्रीगुरूलीलामृत । श्रुतिस्मृतिपुराणसंमत । ब्रह्मनिष्ठ वामन विरचित । प्रथमाध्याय सुरस हा ।। ६५।। 


।। श्रीगुरूदेव दत्त स्वामी समर्थ ।।