Mar 30, 2023

श्रीरामनवमी विशेष - श्रीधरस्वामींचे श्रीरामनवमी प्रवचन आणि श्रीरामोविजयतेतरामस्तोत्रं


श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ श्रीराम जय राम जय जय राम


श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीधरस्वामींचे श्रीरामनवमी प्रवचन


आज श्रीरामनवमीचा दिवस आहे हें आपणांस माहीत आहेच. आज श्रीरामरायांचा जगाच्या उद्धारार्थ झालेला दिव्य जन्म, त्यावेळची ती आनंददायी आठवण तो आपणास प्रतिवर्षी करून देत असतो. अधर्म, अनिती, दुष्प्रवृत्ती म्हणजे अधिक विषयसुखाचा पेटलेला वणवा व स्वेच्छाचार जगांत माजला म्हणजे जगाचें हें दुःख घालविण्यासाठी आणि स्वतःच्या आनंदाचा आविर्भाव सर्वत्र करण्यासाठी परमात्मा अवतार घेत असतो. स्वेच्छाचारापासून, अनीतीपासून जें दुःख झालें तें नष्ट करून धर्माच्या नीतीच्या सदाचाराच्या स्थापनेसाठीं तो आनंदरूप परमात्मा आविर्भूत होत असतो. दशरथ म्हणजे साधक व कौसल्यारूपी बुद्धी ही त्यांची धर्मपत्नी. साधक जेव्हां श्रद्धेनें, भक्तीनें वैराग्य आंगी बाणवून आत्मसाक्षा- त्काराला सर्वतोपरी अनुकूल असें आचरू लागतो तेव्हां त्याच्या बुद्धीरूपी कौसल्येत आनंदघनरूपाचा आविर्भाव होतो. तोच आत्म- साक्षात्कार आणि तोच श्रीरामाचा अवतार. बुद्धीरूपी कौसल्येचा गर्भ म्हणजे मीपणाची स्मृति त्या स्मृतींत आत्मसाक्षात्कार व्हावयाचा आहे व त्या आत्मसाक्षात्कारानेंच आपली तृप्ती व्हावयाची आहे. हें मीपणाचें भान देहरूप नसून तें ज्या मंगलमय आनंदमहोदधींपासून निर्माण झालें. तो आनंदमहोदधीच 'मी' अशा ख-या आनंदाचा अनुभव येऊन आत्मस्वरूपाचा साक्षात्कार झाला, तो आनंद अखंड स्थिरावून प्रगट झाला म्हणजे रामरायाचा अवतार झाला. श्रीसमर्थांचाहि जन्म आजचाच. श्रीसमर्थ व श्रीराम यांच्यात भेद नाही हेंच आजच्या श्रीरामजन्मकालीं सिद्ध होतें. 'जय जय रघुवीर समर्थ ।' श्रीरामोविजयतेतरामस्तोत्रं अथवा श्रीराममन्त्रराजस्तोत्रम्  हे स्तोत्र श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीधरस्वामींनी अयोध्या येथे रचले असून याचे वैशिष्ट्य असे की या प्रभावी स्तोत्रातील प्रत्येक श्लोकाच्या चरणातील पहिले अक्षर घेतले असता “श्रीराम जय राम जयजयराम” हा तारक पावनमंत्र तयार होतो.

श्रीरामः श्रीकरः श्रीदः श्रीसेव्यः श्रीनिकेतनः । राक्षसान्तकरो धीरो भक्तभाग्यविवर्धनः ॥१॥ भावार्थ : विश्वव्यापक प्रभू श्रीराम हेच ऐश्वर्यदाता, भाग्यविधाता, प्रत्यक्ष श्री म्हणजे लक्ष्मी ज्यांच्या चरणीं वास करते असे, वैभवाचे आगर, राक्षसांचा विनाश करणारे, धैर्यशाली आणि भक्तांचे भाग्य वाढविणारे आहेत.     रेति व्यस्तंयन्नाम जपन् व्याधोऽभवदृषिः । न्मदुःखनुदं काव्यं दिव्यं व्यरचयन्महत् ॥२॥ भावार्थ : ‘मरा,मरा’ अशा उलट्या नामाचा जप करूनही एक व्याध म्हणजे पारधी महर्षी अर्थात वाल्मिकी ऋषी झाला आणि त्यांनी श्रीमद्वाल्मीकीय रामायण नामक महाकाव्य रचले. जन्म घ्यावा लागणे, हे सर्व दुःखाचे मूळ कारण आहे. त्या चक्राचा समुळ नाश करणारे असे हे दिव्य काव्य आहे.  दा यदा भवेद्ग्लानिर्धर्मस्य स तदा तदा । राक्षसान्तकरो रामो सम्भवत्यात्ममायया ॥३॥ भावार्थ : जेव्हां, जेव्हां धर्माचा ऱ्हास होवूं लागतो, तेव्हां तेव्हां अधर्मी राक्षसांचे निर्दालन करण्यासाठी ते लीलाविग्रही श्रीराम पुन्हा अवतार घेतात.  हामोहकरी माया यत्प्रसादाद्विनश्यति । घन्या अपि पूज्याश्च पावना बहवोऽभवन् ॥४॥ भावार्थ : ज्यांचा कृपाप्रसाद प्राप्त झाल्यावर, मोहजालाने ग्रासून टाकणाऱ्या मायेचा सहजच नाश होतो. अशा त्या प्रभू रामचंद्राच्या वरदानाने अनेक पापीजनदेखील पवित्र आणि पूज्य होतात.     स्य प्रसादतो जातो हनूमान् महतो महान् । न्ममृत्युजरादुःखान्मुक्तोऽद्यापि विराजते ॥५॥ भावार्थ : त्यांच्या कृपाप्रसादाचा परमलाभ झाल्याने श्री हनुमान महान योगी तर झालाच, शिवाय  जन्म-मृत्यु आणि जरा म्हणजे वृद्धत्व ह्या भवतापांतून मुक्त होऊन अर्थात चिरंजीव होऊन कीर्तिवंत झाला आहे. स्मात्परतरन्नास्ति यस्य नाम महद्यशः । रामं लोकाभिरामं तं व्रजामः शरणं मुदा ॥६॥ भावार्थ : या जगती ज्याच्याहून श्रेष्ठ असे दुसरे कोणीच नाही, ज्याचे नाम परम यशदायक आहे, जो लोकांना सर्वदा आनंदप्रदान करतो, त्या प्रभू श्रीरामचंद्रांना मी अनन्यभावाने शरण जाऊन, भक्तिपूर्वक नमन करतो.  मैतयिति नः सर्वान् संसारात्तारयिष्यति । श्री राम जयरामेति जयजयेति जपाद्ध्रुवम् ॥७॥ भावार्थ : ‘मी अन माझे’ ह्या आसक्तिरुपी संसारात गुरफटलेल्या सर्व जीवांनी केवळ  ”श्रीराम जय राम जय जय राम” या महामंत्राचा जप केल्यास ते या भवसागरातून निश्चित तरुन जातील. राम एव परम्ब्रह्म राम एव परागतिः । नः शान्तिकरोरामो मन्मथारि नमस्कृतः ॥८॥ भावार्थ : श्रीरामप्रभू हे साक्षात परब्रह्म आहेत आणि श्रीराम हेच अंतिम साध्य अर्थात मोक्षप्राप्तीचे साधन आहेत. मनाला असीम शांती देणारे, मनाला विचलित करण्याऱ्या वाईट विचारांचे निरसन करणारे असे हे श्रीराम- त्यांना मी भक्तिपूर्वक नमन करतो. यत्रययुतः श्रेष्ठो रामत्रययुतो मनुः । त्र श्रीराममहिमा त्रिसत्यमिति वर्ण्यते ॥९॥ भावार्थ : तीन प्रकारचा जय प्राप्त करणारा असा सर्वश्रेष्ठ मनु म्हणजे राजा श्रीराम होय. असे  श्रीरामांचे चरित्र महात्म्याचे वारंवार मनन करणे म्हणजे त्रिवार सत्यच सांगणे होय.  रामः श्रीसीतया युक्तः सर्वैश्वर्यव् इत्यपि । हत्वमस्यानन्तं यत् तच्छ्रीरामपदे स्थितम् ॥१०॥ भावार्थ : भगवती सीतेसह असलेले श्रीराम हे सर्व ऐश्वर्य प्रदाता आहेत. जो श्रीरामचरणीं लीन झाला, त्यास अनंत भाग्य प्राप्त होते.   य रामपदेनायं जयरूप इतीर्यते । तोऽसौ जयरूपो हि जयार्हो जयदस्तथा ॥११॥ भावार्थ : ‘जय राम’ ह्या पदाने ज्याचे स्वरुपवर्णन केले जाते आणि तो स्वतःच जयरूप आहे.    त्याच्या या नामाचा सतत जप केला असता, ते सर्वदा जयच म्हणजे यश-सफलताच प्रदान करते. यजयेति पदेऽर्थोऽयं द्योतते सर्वसिद्धिदः । स्मिन्न माया नाविद्यां तस्मिन्मोहःकथं भवेत् ॥१२॥ भावार्थ : ‘जय जय’ या मंत्राचा अर्थ सर्व सिद्धिदायक असाच आहे. या मंत्रप्रभावामुळे माया, अविद्या ह्यांचा सहजच नाश होतो तर मग तिथे मोह तरी कसा राहणार ? अर्थातच या तीनही विकारांचा या रामनामाने पराजय होतो.  रामत्रये दाशरथिश्चेशो ब्रह्मेति कथ्यते । रूदात्मजसन्त्राता मोचयेन्मन्दनादपि ॥१३॥ भावार्थ : दाशरथी (दशरथपुत्र), ईश (परमेश्वर) आणि ब्रह्म ही प्रभू श्रीरामांचीच तीन नामे आहेत. अशा रामरायांचे भक्तिपूर्वक स्मरण केले असता प्रत्यक्ष वायुपुत्र हनुमान आपले रक्षण करतात.      श्री रामेति पदं पूर्वं जयरामेति वै ततः । रामोऽत्र द्विर्जयात्पश्चाद्वर्तते मनुराजके ॥१४॥ भावार्थ : ‘श्रीराम’ ह्या पदाच्या आधी ‘जय राम’ या पदाचा उच्चार करणे याचाच अर्थ प्रभू रामचंद्रांचा सर्वत्र विजय असो, हा आहे. अर्थात दोनदा असा जयजयकार केल्यावर सर्व मानवांत श्रेष्ठ आणि रत्नांप्रमाणे दैदिप्यमान, तेजस्वी असे राजाराम शोभून दिसतात.  हासंसारव्यामोहान्मोचयत्याश्वयं मनुः । पनीयः कीर्तनीयो मुदा सर्वैश्च सर्वदा ॥१५॥ भावार्थ : या  विशाल भवसागरांत मोहादि विकारांमुळे गटांगळया खात असतांना हेच ‘राजाराम’ नाम मनुष्याला तारू शकते. म्हणून सर्वांनी आनंदपूर्वक या सुखदायक रामनामाचा जप करावा. तसेच त्यांच्या लीलांचे गुणगानही नेहेमी करावें. ज्ञराक्षसभूताद्या पीडाऽनेन विनश्यति । रामो धनुर्धरो नित्यं संरक्षति पदे पदे ॥१६॥ भावार्थ : धनुर्धारी श्रीराम यज्ञादी शुभकार्यांत विघ्नें आणणाऱ्या भूत-राक्षसांचा समूळ नाश करून, धर्मकार्य आणि त्यांच्या भक्तांचे नेहेमीच संरक्षण करतात. अर्थात् ‘श्रीराम’ या पवित्र नामजपाने पदोपदी आपले कल्याण होईल.  दोन्मत्तनरैश्चापि न दुःख लभते कदा । न्मसन्तापचन्द्रोऽयं ज्ञानविज्ञानदो मनुः ॥१७॥ भावार्थ : श्रीरामचंद्रांचे सतत स्मरण केल्यास अत्यंत मदोन्मत्त मनुष्यांपासूनही आपल्याला कधीच त्रास होणार नाहीं. या भवतापाचे मूळ कारण हे जन्म-मृत्यूचे चक्र आहे, याची जेव्हा जाणीव होते. तेव्हा, दिव्य रामनामाचा जप मनुष्यास चंद्राप्रमाणे शीतलता देतो आणि त्या परब्रह्मस्वरूपाचे ज्ञानही प्राप्त करून देतो.  त्रकुत्रापिजप्योऽयं शुचिर्वाप्यशुचिस्तथा । पतःशान्तिमाप्नोति प्रशस्तोऽस्मिन्कलौमतः ॥१८॥ भावार्थ : कुठेही आणि कधीही ह्या पवित्र नामाचा जप केला असता, तसेच शुचित्व म्हणजे सोवळं-ओवळं पाळून अथवा अगदी शुचिर्भूततेचे नियम न पाळतासुद्धा जरी अंतःकरणपूर्वक म्हणजेच पूर्ण श्रद्धेने रामनाम घेतले तरी ते सर्वदा सुखकारक आणि शांतिदायक होते. या सांप्रत कलियुगात हे दिव्य रामनाम अतिकल्याणकारी आहे.   ज्ञानां जपयज्ञोऽस्मि भगवद्वाक्यमीदृशम् । रामेणैव पुरादिष्टः षडङ्गादिविवर्जितः ॥१९॥ भावार्थ : “ यज्ञांमधील जो जपयज्ञ आहे, ते साक्षात माझे स्वरूप आहे. “ अशी भगवान श्रीकृष्णांनी गीतेत ग्वाही दिली आहे. तर, षडङ्गादिविवर्जित असा नामजप भवतारक आहे, असे त्रेतायुगात प्रभू श्रीरामांनीही त्यांच्या भक्तांस वचन दिले होते.    रूत्सुतावताराय रामदासाय धीमते । श्रीरामवरयुक्तोऽयं सुलभोऽपि फलाधिकः ॥२०॥ भावार्थ : प्रत्यक्ष वायुसुत हनुमानाचेच अवतार असणारे, बुद्धीमंत श्रीसमर्थ रामदासस्वामी यांना केवळ रामनामाच्या तपोबळावरच प्रभू रामचंद्रांचे वरदान प्राप्त झाले. खरोखर, रामनामासारखे अति सुलभ आणि अनंत फळ देणारे दुसरे काहीच नाही.  त्रैलोक्यपावनी पुण्या मुक्तिदाराघवस्तुतिः । भद्रं तनोतु लोकेषु गङ्गेव किल सर्वदा ॥ भावार्थ : श्रीरामप्रभूंचे स्तवन हे गंगाजलाप्रमाणेच सर्वदा पुण्यकारक असून तीनही लोकांना पावन करते. ते परम कल्याणकारी आहे.    ॥ इति श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य सद्‌गुरु भगवान श्रीधरस्वामीमहाराजविरचितं श्रीरामोविजयतेतरामस्तोत्रं / श्रीराममन्त्रराजस्तोत्रम् सम्पूर्णम् ॥

॥ श्री गुरुदेव दत्त


स्रोत : https://shridharamrut.com/