|| श्री गणेशाय नमः || श्री दत्त समर्थ ||
या सोहळ्याच्या वेळी पालखी व श्रींची आरती यांचा फेसबुक लाईव्ह व्हिडियो व सोबत या उत्सव समितीचे अध्यक्ष श्री. स्वामीभक्त श्री मिलिंद पिळगांवकर यांनी स्वामीभक्तांना सांगितलेली या महापर्वणी उत्सवासंबंधी थोडक्यात माहिती !
श्रीस्वामी समर्थ महापर्वणी हा उत्सव प्रत्यक्ष श्रीस्वामीसुत महाराज यांनी इ.स. १८७० साली सुरू केला होता. मागील १५ वर्षांपासून गिरगांव येथे होणाऱ्या या उत्सवा मध्ये आजही श्रीस्वामीसुत महाराजांना अभिप्रेत असलेल्या थाटामाटात पालखीमधून श्री स्वामींच्या पादुका, मूर्ती आणि सोबत भगवे निशाण (भगवा ध्वज), गुढी घेऊन नामस्मरण करत करत तमाम स्वामीभक्त गिरगाव समुद्रकिनाऱ्यावर येतात व सगळे मिळून स्वामींच्या पादुकांना समुद्रस्नान घालतात. श्रीस्वामी समर्थ महापर्वणी उत्सवाने ११ कपिलाकष्टी केल्याचे बळ लाभते, पुण्य लाभते, असे प्रत्यक्ष श्रीस्वामीसुत महाराजांनी सांगितले आहे.
सौजन्य : Shree Swami Samarth Bhakt Parivar
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.